शुक्रवार, 5 मई 2017

कोण मी कोण मी On C2 to upload (आधीचा भाग राहिला आहे

कोण मी कोण मी -- (आधीचा भाग राहिला आहे)

अलीच्या प्रश्नांवर आतापर्यंत मंत्रीमंडळाच्या दोन-तीन बैठका झाल्या होत्या. सरकारम्हणणं होतं की अली हा एक खास पक्षी तज्ज्ञ आहे, म्हणून त्याच्या सुरक्षेची  पूर्ण जबाबादारी सरकारने घेतली आहे. ती सरकार पूर्णपणे पेलणार आहे . प्रत्येक स्तरावर ही सुरक्षा राखली जाईल. पण सरकार म्हटलं म्हणजे त्याचा खाक्या लोकांना माहीत असतो. जाहीरपणे जे बोललं जात, प्रत्यक्ष त्याच्या अगदी उलट असतं .सरकारी सगळी वाक्यं भविष्यकालदर्शक तरी असतात किंवा विध्यर्थ म्हणजे अमुक - तमुक व्हायला पाहिजे अशीत्यामुळे वर्तमानकाळात गुन्हेगार त्यांचे कांम बिनघोर चालू ठेवू शकतात. असलं अंडरस्टॅण्डिंग सरकार आणि माफिया यांच्यामधे अलिखितपणे- तयारं झालं होतं सरकारच्या सध्याच्या घोषणांमधे सुद्धा ही मेख होती-.
अलीवर यामुळे जे संकट येणार होतं . त्याची  कल्पना त्याला आलेली होती. त्याचं  फिरणं बरसं कमी करावं लागणार होतं . आपण पक्षी झाल्याची आता त्याला खंत वाटू लागली . तो पक्ष्यांप्रमाणे स्वच्छंद आणि मुक्त राहू शकणार नव्हता आणि पुन्हा माणसांतही परत जाऊ शकणार नव्हता. त्याला फजल ताविशचा  एक शेर सारखा आठवत होता-
"मैं हवा, पानी, परिंदा कुनही।
ये नदी जाने कहां तक जायेगी।"

-----
जंगल आता शिकाऱ्यांनी आणि पारध्यांनी गजबजून गेलं होतं. अली लपून पून वावरत असे . इतर पक्ष्यांकडून त्यांची  माहिती घेण्याची गोष्ट बाजूलाच पडली . अशा त-हेने होणाऱ्या उपद्रवांची त्याने कल्पनादेखील केली नव्हती. राजनीती आणि नोकरशाहीचे  तंत्र त्याला ठाऊक नव्हते. पक्ष्यांपलीकडंच्या माणसांचे जग किती विनाकारण क्रूर असू शकतं हे त्याला आता कळत होतं , सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी होती की त्याला पकडण्याच्या मोहिमेत कित्येक इतर दुर्लभ पक्ष्यांची देखील हत्या आणि पकडापकडी होत होती. कित्येकदा त्याला वाटायच..........  आणि तो लपण्यासाठी नव्या जागेचा शोध घेत फिरायचा . तसं पाहिल तर सगळ्यापक्ष्यांमधेही
खळबळ माजली होती. त्यांच्यावरील संकट आणि त्यातून सुटकेचा मार्ग त्यांना कळत नव्हता. निसर्गदत्त बुद्धीने काही वेळा संकट ओळखता येत असे एवढंच. कुठे जावं आणि काय करावं तेपक्ष्यांना कळत नव्हत. पोपट आणि मैना थोड फार माणसांरखं बोलू शकत . तेही आता गप्प झाले होते. जंगलातील पक्ष्यांची  किलबिल संपून वातावरण आता गप्प- गप्प उदासवाणं झाल होतं.

अलीला मनुष्य बोली बोलता येण्याचा एक फायदा झाला होता. शिकाऱ्यांची टोळी त्याच्या जवळपास आली की तो मानवी आवाजात बोलत असे अरे तिकडे , तिथे नाही इकडे -या सागवानात- अरे येडपट, तिकडे त्या करवंदाच्या जाळीत. शिकारी मोठ्या टोळ्यांनी फिरत . त्यांना वाटायत्यांच्यातलाकुणी तरी बोलला, मग ते पुढे निघून जात. अशा प्रकारे अलीने कित्येकदा स्वतःचा जीव वावला होता. हळूहळू  त्याला हा खेळ वाटू लागला. शिका-यांना कवण्यात त्याला सूड उगवण्यासमाधान वाटू लागलं . एखाद्या कठीण रस्त्यावर त्यांना लावून दिलं आणि तिथून दमून- भागून हात हलवत ते परत आले किंवा एखाद्या काटेरी जाळीकडे त्यांना वळवलं आणि त्यांना बरंलागंल की अलीला मजा वाटायची . पण एकूण त्यांच संकट मात्र वाढतहोत. दोन दिवसांपूर्वीएक गोळी त्याच्या अगदी जवळून गेली होती. गेल्या कित्येक रात्री तो नीट झोपू शकला नव्हता कारण मोठ्या मोठया टॉर्च  आणि सर्च लाइटांनी जंगलाची  अंधारी सुरक्षितता संपवून टाकली होती.
हळूहळू दुसरीकडे एक वेगळी- मोहीम सुरू झाली . पर्यावरणवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या हत्याकांडाविरूद्ध आवाज उठवला. मग तर मोर्चे निघाले , धरणं धरलं गेलं , उपोषण झालीरॅली निघाल्या. या संघटनांना आंतरराष्ट्रिय एजन्सीकडून पैसे पुरवले जातात . त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडीयावर त्यांच्या बातम्यांना चांगलं कव्हरेज मिळतं होत. विदेशी टि .व्ही आणि वर्तमानपत्रांचे रिपोर्टर आपापल्या कॅमे-यांसह  एकटे किंवा गटागटाने जंगलात फिरू लागले. सरकारची  एक नवीन डोकेदुखी होऊन बसली. आधी सरकारने पर्यावरणवादी गटांचे आरोप धुडकावून लावले. मग चौकशींआश्वासनं दिलं . इकडे आतूनच  माफिया टोळ्यांना गप्प बसायला सांगितलं . त्यामुळे शिका-यांची मोहिम बरीचशी थंडावली . अली आता या लपून पून जागण्याला कंटाळला होता. त्याला घराची  तीव्रतेने आठवण होऊ लागली. शेवटी एक दिवस तो त्याच्या सुरक्षित ठिकाणावरून बाहेर पडला आणि घराच्या दिशेने उडू लागला. त्या दिशेने सरसावून बसलेल्या कित्येक बंदुका गरजल्या. कित्येक गलोलीतून दगड उडवले. गेले.............
-----
प्रिय वाकं, यानंतर कायं झालं ते कोणालामाहित नाही. जितकी माणसं तितकी कथानंक! जसं अलीच्या पक्षी होण्याबद्दल कितीतरी सिद्धान्त पुढे आले, तसेत्याच्या शेवटाबद्दलही , कुणी म्हणे, ठीकआहे, किती दिवस वाला असता? एका छोटया पक्ष्याची  ही हिंमत, की इतक्या शिका-यांना इतके दिवस त्यांन झुलवत ठेवांव? थोडक्यात या लोकांमत होतं की अली त्यादिवशी मारला गेला आणि त्या छोट्या पक्ष्याशव फेकून दिलं . पण कुणी फेकलं ? कसं फेकलं? इतर लोकांनी काय डोळे मिटून घेतले होते? कुणीकसं बघितल नाही ? अशा नाना शंका, प्रश्न , उपप्रश्न! काहींमत होतं की पर्यावरणवाद्याच्या दबावामूळे आणि सरकारच्या आश्वासनामुळे त्या दिवशी शिकारी गटांच्या हालचाली थांबल्या होत्या. याचा  फायदा  घेऊन अली सहीसलामत आपल्या घरांत परत आलापण ही गोष्ट अगजी दबक्या आवाजात बोलली जायची  कारण दबक्या आवाजात बोलल्याने त्या गोष्टीची विश्वसनीयता वाढते. हो लोक म्हणत की आता अलीच्या बायकोने त्याला लपवून ठेवलं आहे . पहात रहा एखाद्या दिवशी जंगलाच्या सगळ्या अवैध गोष्टी अशा जाहीर होतील की मोठा भूकंप झाल्याप्रमाणे कित्येक मोठ्या लोकांच्या पॅण्टी ओल्या होतील . काही लोक निमित्त काढून अलीच्या घरी येऊन-जाऊन इकडे तिकडे डोकावयाचा प्रयत्न करीत , कुणी म्हणत की सरकारने पण पोलिस पाठवून त्याच्या घराची झडती घेतली, पण सरकारी अधिकारी हात हलवत परत आले .विभिन्न गोष्टी रण्यात लोक पटाईत होते. अशाप्रकारे कित्येक राईचे पर्वत निर्माण झाले.
पण काही लोक याच्याही पुष्कळ पुढे गेले होते. त्याच्या किश्श्यांना तोड नवहती . ते या घटनेंचे असं वर्णन करीत जणू याचि  देहि याचि डोळा ती घटना पाहिली . ते म्हणत- अहो साहेब, आम्ही स्वतः पहिलं आमच्या डोळ्यासमोर अलीला गोळी लागली. रक्ताचे दोन थेंब पण जमीनीवर सांडले. आणि नंतर काय झालं म्हणून सांगू! तुमचा विश्वास नाही बसणार! पण देवाशप्पथ सांगतो बघा, एक चमत्कार झाला. गोळी वितळून सोनेरी पाणी होऊन जमिनीवर ओघळली आणि अली? अलींतिथल्या तिथे दुस-या पक्ष्यांत रूपांतर झालं . अहाहा, काय त्यांरूप, काय त्याचा डौल! आणि साहेब त्याचा  वेग तर विचारूनका. डोळे ठरायच्या आत तो उडून कुठच्या कुठे दिसेनासा झाला होता! "
या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोकही शहरात भरपूर आहेत. त्यांच्याशी तुम्ही तर्कवितर्क केलात तर ते म्हणतात- जर मुळात एक माणूस पक्षी होऊ शकतो तर मग........
  अशीही एक अफवा आहे की शिका-यांच्या काही टोळ्या अजून जंगलात फिरताहेत आणि अलीला शोधताहेत! या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान शहरातील एका शायराने त्या पक्ष्यावर एक मृत्यूलेखही लिहिला. पण तेवढयात इतर कहाण्यांचा जन्म झाला. अलींमरणं अजून निर्विवाद ठरलेलं नाही. त्यामुळे हे शायर महाशय अजूनही तो मृत्युलेख खिशात ठेवून फिरत आहेत. कोण जाणे कधी ती बातमी येईल आणि शोकसभेत मृत्युलेख वाचावा लागेल!
(मूळ हिंदी- मैं, हवा, पानी , परिंदा कुनहीं!
फेब्रुवारी ९९ , हंस)















































मंगलवार, 28 मार्च 2017

बदला निर्मला भुराडिया

      बदला
    किती वेळ झाला पण छोट्या आत्याच हात धुणं कांही संपत नाही. चार -सहादा साबण रगडून झाला असेल हातांना ! पण अजूनही कांहीतरी ओंगळ त्या हातांना चिकटून राहिल्या सारख वाटतय्. तो ओंगळ स्पर्श मनावर आणि शरीरावरही अजून चिकटून बसला आहे. तो जावा म्हणून त्या रात्री सुद्धा छोटी आत्या असच साबण लावून लावून अंग धूत  बसली होती ! . पण कुंवरजींच्या देहाचं  आक्रमण, त्याच्या खुणा तिच्या शरीरावरून गेल्या नाहीत पुसल्या गेल्या तरी मनावरून कधीच पुसल्या .
        छोटी आत्या तेव्हां होती तश्शीच अजून आहे. गोरीपान, नाजुक बाहुलीसारखी ! हात लावला तरी मळेल अशी नितळ कातडी! आणि स्वच्छतेचेही  कोण वेड होतं! जरा इकडे तिकडे हात लागला तरी लगेच धूत असे! ते लावण्य आता वाढत्या वजनामुळे थोड गोलाकार  झालय एवढच कांय ते!
          मात्र एक मोठा फरक झालाय तिच्यामध्ये! सुगंधाच फार फार वेड होत छोट्या आत्याला . उशीखाली मोग-याची फुलं उशाशी घेतल्याशिवाय झोपू शकत नसे!  तीच आता रात्रंदिवस या बिन खिडकिच्या अंधा-या कुबट वासाच्या खोलीत कुंवरजींच्या बरोबर रहाते. कुंवरजींची संपूर्ण जबाबदारी तिनेच उचलली आहे. अगदी स्वखुशीने । सकाळी उठल्याबरोबर त्यांना पॉट देणं . मग  दांत घासून गुळण्या केलेली भांडी स्वच्छ करणं . बिछान्याच्या चादरी बदलण, कुंवरजींच  आंग ओल्या टॉवेलने पुसून  काढण. त्यांचे कपडे बदलून देणं, कपडे , चादरी, धुण- तरीही प्रत्येक काम, प्रत्येक स्पर्श तितकाच ओंगळ वाटतो- जितका पहिल्या रात्रीचा! मग हात धुवून धुवून तो स्पर्श घालवायचा प्रयत्न करते  छोटी आत्या!
          आत्ता रात्रीच्या जेवणाची गोष्ट! आत्याने वरणांत बुडवून पोळीचा घास कुंवरजींच्या  तोंडासमोर आणला आणि कुंवरजींनी तोंड फिरवल . अस्सा राग आला आत्याला! तिने तिने घास थाळीत ठेवला आणि थाळी उचलून भिंतीवर आदळली. भाज्या, वरण , चटण्यांची पंचरंगी चित्रकारी भिंतीवर उमटली. कुंवरजी तोंडाने गों- गों करण्याशिवाय कांही करू शकले नाहीत. कांय करणार? आत्याच्या हातांचा आधार नसल्याने बिछान्यावर आदळले. भांडी आवरतांना आत्यानी  मनाशी विचार केला ''सावधान, इतका राग-राग केला तर आपल एकमेव शस्त्र  बोथट होऊन जाईल . मग एवढी सेवा करण्याचा कांय उपयोग !''
            पटकन सर्व विखुरलेल अन्न आवरून छोटी आत्या दुसरी थाळी घेऊन आली . यावेळी कुंवरजींनी तोंड फिरवल नाही, पण अस्फुट आवाजात कांही तरी सांगण्याचा प्रयत्न केला- त्याचा अर्थ होता कि मला जेवण भरवण्यासाठी दुस-या कुणाला तरी बोलव! आत्याला अर्थ कळत होता, पण तिकडे दुर्लक्ष करून  तिने पुनः पोळी भाजीचा घास पुढे केला. कुंवरजींनाखूप राग आला. डोळे वटारून आणि कांही तरी रागाने बोलून त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून गों- गों शिवाय शब्द फुटले नाहीत. त्यांनी पुनः तोंड फिरवायच्या आंतच आत्याने घास त्यांच्या तोंडात कोंबला. निरूपाय कुंवरजीं जेऊ लागले. संपूर्ण जेवण भरवून , हात तोंड धूवून देऊन आत्याने आधार देत त्यांना व्यवस्थित निजवल. मग इतर आवरा -आवरी करून मोठा दिवा विझवला आणि सोफ्यावर जाऊन बसली.
            सोबतीला एक नाईट -लॅम्प- बस! जणू उजेडाशी काहीच घ्यायची होती आत्याला . उजेडाने दिल तरी काय? अंधारात निदान भिंतीवरील सावल्यांची तरी सोबत होत होती! ''आ''~~ थोडस कण्हतच कुंवरजींनी कुशी  बदलण्याचा प्रयत्न केला! आपले विचार मध्येच थांबवत छोटी आत्या उठली आणि स्विच ऑन करून सावल्यांना घालवून टाकलं.
            ''काय झाल, पाणी हवय् कां ?"
      ''उं- हूं'' कुंवरजींनी डोळ्यांवर पापण्यांचे जाड पांघरूण घालून नाहीचा इशारा केला.
      ''मग झोपा आता'' म्हणत आत्याने पुनः दिवे घालवून सावल्यांना जवळ बोलावल, जणु एखादी जिवलग मैत्रीणच ! मग त्या मैत्रीणीच बोट धरून भूतकाळांत चक्कर मारायला आत्याला भीती वाटत नाही! त्या भूतकाळातल सगळ स्वच्छ दिसत या अंधा-या खोलीतून!
         बाबासाहेबांच्या घरांतला तो मोठा चौक  आणि तिथली   नोकरा चाकरांची वर्दळ . चौकाच्या आजू बाजूला खोल्या , त्यांच्यावरच्या मजल्यावर अजून खोल्या आणि त्यांच्यावर गच्ची. संपूर्ण घराचा केंद्रबिंदू होता हा चौक ! एका वास्तूपंडिताने बाबासाहेबांना सांगून ठेवल होतं की घराच्या मध्यभागी सूर्याचा उजेड नक्की यायला हवा. याच उन्हात बसून छोटी आत्या.......... म्हणजे तेंव्हा ती छोटी आत्या नव्हती........ नुसती छोटी बाई होती छोट्या बाईने चम्पाला हाक मारली होती वेणी घालून द्यायला. कसे दाट आणि लांबसडक केस होते छोट्या बाईचे! कुरळे, दाट आणि गुडघ्यांपर्यंत रूळणआरे! आजी तर कुणाच्या समोर केस मोकळे करू दोत नसे पण इतक्या मोठ्या केसांना छोटी बाई कशी आवरणार? त्यासाठी कुण्या चम्पा, चमेली, रानो, बन्नोची गरज लागणारच! शिवाय ते केस धूण! चोळून, माखून, उटण लावून केस धुतल्यानंतर त्यांना वाळवायला कुणी तरी हव! आणि सुवासिक तेल लाऊन  विंचरून द्यायला पण कुणीतरी हव! बाबासाहेबांच्या घरी अशा बायांना कांय तोटां ?
          छोटी बाई हे तर तिच लाडक नाव होत. तिच खरं नाव रूपकुंवर! नावाबद्दल शंका घ्यायला जागाच नव्हती. तिच्यासारख रूप लावण्य  पंचक्रोशीत शोधून  सापडल नसत ! शिवाय बाबासाहेबांसारख्या मोठ्या संस्थानिकांची एकुलती एक धाकटी लेक! मोठा मुलगा लहानपणापासूनच शिकण्यासाठी परदेशी ठेवलेला!
          आईविना पोरीला वडीलांचे सगळे लाड मिळाले. तिच्या तोंडून शब्द निघायचा अवकाश , की वस्तू तिच्यासमोर हजर
झाली पाहिजे अशी, बाबासाहेबांची आज्ञा होती. कपडे, दागिने ,अत्तर!  हिंदुस्तानात मिळत नसेल तर अमेरिका, इंग्लंड, फ्रांस,कुठूनही वस्तू येऊ शकत होती. फक्त एका गोष्टीची मनाई होती पडद्याबाहेरची दुनिया रूपकुंवासाठी नव्हती. मंदिरात जायच तरी अवती- भोवती चम्पा , चमेलींचा घोळका असला पाहिजे असा बाबासाहेबांचा कडक हुकुम होता. पुरूष जातीपैकी फक्त कांही काळे कूरूप म्हतारे नोकरच पहायला मिळाले होते. इंग्रजीची ट्युशन होती तीही मेरी नामक बाईची!
           शिवाय रूपकुंवारला सतत बजावलेल होत ती सर्वांपेक्षा खूप खूप श्रेष्ठ होती रूपाने , पैशाने, कुळाने! आणि खुप खुप पवित्र पण! इतर पुरूषांची नजर तिच्यावर पडता कामा नये. बाबासाहेबांना भेटायला इतर  पुरूष मंडळी येत तेंव्हा बाबासाहेब तिला सांगत- "छोटी बाई, तू आता घरात जा." रूपकुंवरने पण आयुष्यांत हाच मंत्र शिकला होता कि पुरूष जातीपासून दूर रहा . आणि हाच मंत्र मनांत घोकणा-या मुलीला एक दिवस एका पुरूषाबरोबर शय्यासोबत करायसा सांगण्यात आल! म्बणजे काही वेड वाकड मनात आणू नका बाबासाहेबांबद्दल- त्यांनी एखाद्या मोठ्या जमीनदाराला किंवा आधिका-याला  खूष करण्यासाठी आपली पोरगी पाठवली अस मुळीच झाल नाही! त्या साठी गरीबांच्या मुली खूष होत्या!  त्या असताना स्वतःच्या पोरीवर ही वेळ कशी येऊ देतील बाबासाहेब? त्यांनी रीतसर लग्न लावून दिल होत छोट्या बाईच! ते देखील धूम धडाक्यांत -चांगला दोन महीने उत्सव साजरा करून . कांय नव्हत त्या उत्सवात? खाण- पिण, गाण- बजावण, फटाके, शोभेचीदारू! मान-पान ! पण इतक्या धून धडाक्यात अशी कुणीच चम्पा, चमेली नव्हती जी रूपकुंवरला लग्नाला किंवा मधुचंद्राचा अर्थ सांगेल! कारम त्या तिला घाबरत होत्या . आतापर्यंत तिला "जो हुकुम" करण्यांतचट ज्यांच आयुष्य गेल त्या तिला मधुचंद्राचा अर्थ कसा सांगणार? षोडशी रूपकुंवर आतापर्यंत उत्सवमूर्ति होती. हा लग्नाचा उत्सव पण बाबासाहेबांच्या लाडाचा नमूनाच वाटला तिला . त्या थाटात आणि तो-यांतच ती सासरी आली.   
               बदला
    कुंवरजी पण कुणी साधी आसामी नव्हते. पैसा अडका, जमीन जुमला, मान मरातब, शान शौकत- सगळ्याच बाबतीत बाबासाहेबांच्या दोन अंगुळ वरच होते. उगीचच नाही त्यांना जावई करून घेतल! ते खर दोन तरूण- तरूणींच लग्न  नव्हतंच -दोन मोठ्या खानदानांची दिलजमाई होती ती! तस कुंवरची प्रेम -प्रकरणं बाबासाहेबांच्या कानावर होती.  पण त्यात कांय नवल? अशी ''मर्दानगी''  असलीच पाहीजे एवढ्या मोठ्या श्रीमंताकडे! ज्याच्या  जितक्या रखेल्या , तो तितकाच मोठा मर्द! आणि जी जितकी पवित्र , तितकीच ती खानदानी बाई! बाबासाहेबांना कुंवरजींचा जितका अभिमान होता तितकाच छोटया एकदम पवित्र बाईचा ! होतीच मुळी त्यांची बेटी तशी एकदम पवित्र चौवीस कॅरेट सोनं !
             पण रूपकुंवरची खरी कहाणी इथुनच सुरू होते तिच्या पहिल्या रात्रीच्या कहाणीपासून! ती रात्र जणू तिच्या रूपानेच जगमगली होती. आणि तिच्या अंगावरील सोन्याने. तिच्या लाल दुपट्यावर ख-या सोन्याने.  बेल- बुट्टी काढलेली होती. तिच्या भांगात, केसात स्वर्णफुल होती, तर कानांत ,नाकांत, बाजुबंदावर चमचमणारे हिरे! आणि त्यांच्या साठी आरस केलेल्या खोलीचं कायं वर्णन सांगाव? रोशिम गालिचे, चकाचती झुंबर आणि जाई-जुईच्या हारांनी नटलेले शिसवी बिछाने. हो सर्व कौतुक ठीक होत. पण कुंवरजींने तिला हात लावला मात्र ती जंगली घोडयाप्रमाणे फुरफुरत दूर सरकली! कुंवरजींवर जितके वार करण शक्य झाल, तितके केले कुंवरने तिच शरीर शेवटी भोगलच , पण नंतर तासंसास अंग धूत बसलेली रूपकुंवर तेवढीच त्यांच्या लक्षात राहिली.
             माहेर प्रमाणेच इथेही चम्पा, चमेली, रानो, बन्नो होत्या. नावं वेगळी असतील त्यांची! त्याच आता रूपकुंवरच्या शिक्षिका झाल्या. आंघोळ घालतांना, सजवतांना, श्रृगांर करताना त्यांनी रूपकुंवरला लग्नाच रहस्य समजावून दिल. कोषातल्या सुरवंटाच जणू फुलपाखरू झाल. पण तो  पर्यंत वेळ निघून गेलेली होती. कुंवरजींनी कांय तो धडा घेऊन झाला होता. आता दुखावलेल्या कुंवरजींना रिझवायला रूपकुंवर तयार होती, पण त्यांच्या मनाची पक्की गाठ मोकळी झाली नाही. उलट हे चांगल निमित्तच झाल जुन्या प्रेमिकांकडे परत जायला, त्या निमित्ताचा कुवंरजींनी पुरेपुर उपयोग करून घेतला.
               हळूहळू दिवस पालटले. जमीनदारी संपली .संस्थान पण संपली , पण धनसंपत्ती तशीच राहिली. कुंवरजींच्या घरांत, तशीच आमच्या घरात पण. रूपकुंवर आता आमची छोटी आत्या होती.
            छोटी आत्या पडद्यात वाढली. पण पापा परदेशांत राहिले होते अभ्यासासाठी . त्यामुळे आमच्यासाठी आमचे पापा खुप वेगळे होते .आम्ही को- एड कॉन्व्हेंट मधे शिकतो, जीन-पॅँट, शर्ट घालतो, पण छोटी आत्या योणार असेल तेव्हा नाही. ती ती येणार असली की आईला खास साफ-सफाई करावी लागते. तिच्या घरांत सुद्धा सारखी झाड-झाड आणि पूस-पूस ! कुंवरजी बोलुनही दाखवतात ''या साफ-स्वच्छ रहाण्याच्या हट्टापायीच बिछान्यातही लांब राहते- राहो तशीच‍!'' मग आत्या पण तडकून त्यांच्या रखैली विषयी काही तरी बोलते. यांच हे भांडण आता जगजाहीर झालय. नोकरांना देखील या गप्पा चघळायला शिळ्या झाल्याहेत. कुवरजींच्या मैत्रिणींचे किस्से इतके जगजाहीर झाले आहेत की ताईच्या लग्नांत सुद्धा त्यांच्या मैत्रिणी लांब लांबच्या गावांतून आल्या होत्या कुणी दिल्ली कलकत्याहून , कुणी हैद्राबादहून तर कुणी या जयपूरमधुनच.
                 मग अचानक कुंवरजींचा धंदा बसला आणि त्यांच्या मैत्रिणींनी जमेल तशी त्यांची संपत्ति गिळंकृत केली जमीन, फ्लॅट, दागिने, रोख जिला जे जमेल ते! मग पक्षाघात होऊन कुंवरजी बीछान्याला खिळले तसे त्यांना कुणी विचारणारे पण उरले नाही!
               आणि कालपर्यंत साफ-सफाईच्या नावाने चिडचिड करणारी छोटी आत्या एकदम जादूची पुडी खाल्ल्यासारखी शांत झाली आहे! जिला कधी  पाण्याचा एक पेला इकंडच तिकडे करावा लागला नाही कि धुळित एक बोट घालाव लागल नाही तिने एकटीने कुंवरजींची सारी सेवा आपल्या डोक्यावर घेतली. चम्पा, चमेली कधीच गेल्या. सर्व जायदाद विकून टाकून, एका छोट्या फ्लॅट मधे फक्त दोन नोकर बरोबर घेऊन छोटी आत्या कुंवरजींची सोबत करते. पण कुंवरजींच्या खोलीत जायला नोकरांना पण सक्त मनाई  आहे. त्यांच सगळ एकटी तीच करणार. या खोलीत इतर कोणी नाही फक्त घड्याळ्याची टिक-टिक  ,कुंवरजींचे अस्फुट शब्द आणि त्यांचे चिडलेले, तरी लाचारी सांगणारे डोळे!
             कुंवरजींनी पुन्हा कुशी बदलल्याचा प्रयत्न केला. छोटी आत्या पटकन् उठली. पुनः एकदा भूतकाळातल्या सावल्या बाजूला सारून दिवा लावला. ''कांही हवयं का? '' ''ऊं~हो...'' कुंवरजींनी हात उचलायचा प्रयत्न केला -पण तो धपकन् खाली पडला! आत्या उठली तिने हात उचलून नीट कमरेजवळ ठेवला. अस्फुट स्वरांत कुंवरजींनी याचना केली- ''कुणाला तरी बोलव!" आत्याला शब्द कळतात. कुंवरजींना कुणीतरी चादर बदलून द्यायला हवी आहे, पण आत्याचा स्पर्श नको आहे- ती नजरेसमोरही नको आहे. पण आत्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल. त्यांच्या  खालची चादर स्वतःच ओढून बाहेर काढली . ऊं हूं, ऊं हूं करत कुंवरजींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण आत्याने ऐकल नाही. नाक दाबून घाण झालेली चादर बदलली पण तोंडावर असे भाव होते की ''बोलवा आता आपल्या दिल्ली कलकत्ता वाल्यांना किंवा हैद्राबाद किंवा जयपूर वाल्यांना!'' ती सेवा करत होती पण कुंवरजींना नको असलेली! तिला कळंत की कुंवरजींना तिची सेवा घेताना लाचारी वाटते , ग्लानी वाटते, शरम वाटते आणि रागही येतो.
        ती लाचारी आणि रागच आता आत्यांच शस्त्र होत! तिला आठवत हेच कुंवरजी टेबलावरून तिने प्लेट मांडली एवढ्या कारणासाठी उठून जात. जेवतांना ती समोर आली तर अपशकून झाला म्हणून जेवण टाकून देत. पहिल्या रात्रीचा प्रकार झाला  तो ती नवखी असल्याने . पण नंतर कित्येक रात्री तिने त्यांना रिझवण्यांत घालवल्या तरी ते बधले नाहीत, तिने सेंट ,लिपस्टिक लाऊन, झिरझिरित नाईटी घालून केलेल्या विनवण्या पण ठोकारल्या गेल्या.त्या मेल्या रखेल्या यापेक्षा काय करत होत्या? पण पहिल्या रात्रीच्या घटनेला कुंवरजींनी कधी क्षमा दिली नव्हती.
       आता छोट्या आत्याचे दिवस आहेत. ज्या कुंवरजींना जेवतांना ती समोर चालत नसे, त्यांना जेवण भरवून आत्या  प्रतिशोध घेऊ शकते. तिच तोंड पहाण्यांच टाळणारे कुंवरजी आता सदा सर्वदा तीच समोर असते. कधी डोळ्याला डोळा भिडला कि  एक व्यंगात्मक हास्य आपसूकच तिच्या ओठांवर येत जा, आता कुणाकडे जायच ते ! आणि आज तर तिने कमालच केली चादर बदलताना कुंवरजींच्या चेह-याच चक्क चुंबन घेतलं . त्यांच्या डोळ्यातले भाव सांगतात ''शीः दूर रहा!"
           कुंवरचे रागाने लाल झालेले आणि क्षणांत लाचारीने पाणावलेले डोळे मागतात "मला मुक्ती दे." पण आत्याला त्यांना मुक्ती द्यायची नाही. इतक्यांत नाही. तिचा बदला पूर्ण होईतो नाही. तिला जळत ठेवणा-या कुंवरला आता ती जळत ठेऊ शकते त्याला नको असलेली सेवा देऊन ! बाहेर जग म्हणो-"पहा कांय हा सेवाभाव!  इतक्या रखेल्या ठेवणा-या पतिची एवढी सेवा! पण बंद खोलीत रूपकुंवरला माहीत आहे तिचा बदला छान चाललाय!
---------------------------------------------------------------------------
                                             लीना मेहंदळे
                                   मूळ लेखिका (हिंदी)

                                    हंसच्या अंकातून



 













 






























       














   






























 

गुलमोहर -- लीना मेहेंदळे

                          गुलमोहर
          आता रात्रीचे दोन वाजले असतील मला माहित्येय की, आज मला झोप येणार नाही! टप्- टप्-टप्... बाहेर एकाच तालावर  पावसाचे रडगाणे  सुरू आहे. मधे मधे वारा पण जणू  काही मूड  आल्यासारखा  घोंघावतो -घों  घों...  उगीचच.  मी जसा वर्गात कधी कधी  उठून  उगीचच   प्रश्न करतो तसाच!
           हे ढग एकसारखे कोसळून का नाही जात?  नुसतीच आपली  रिपरिप...!  त्यांना बोअर कस नाही होत?  मसा तर  झालयं बुवा. लोकांना कस या पावसात संगीत दिसत?  मला तर हे  पपांच्या  लेक्चरपेक्षा  असह्य होतंय्!
            मला माहीत नाहीय्- की माहित्येय?  माझ्या डोक्यावर  एक टेन्शन आहे. शरीराची  नसन् नस  टेन्स आहे. मी वाट  बघतोय् -कदाचित पाऊस  थांबण्याची? हे  ढग विरून  गेले तर  कदाचित पुनः  निळंशार  आभाळ नाहीतर निदान समोरच्या  मैदानातला गुलमोहर!  मला बघायचा ध्यास का लागलाय? अंकल सांगत होते.- की  'त्या'  दिवशी ते या गुलमोहराच्या  झाडाखालीच उभे होते अजून  बरचसं  काहीतरी  मी कुठे ऐकलं?  लक्षच दिल नाही. काल संध्याकाळच्या  शोला  जाताना  मम्मी अशा त-हेने  त्यांना  माझ्या तक्रारी सांगत होती- आणि पपा  कसे तिच्या  म्हणण्याला माना डोलावत  होते!  त्यांचं ठरलं असणार-आता मला  सुधारायचं काम  अंकलनी करायचं.... काय करणार?  पपा आणि मम्मीच्या मते  त्यांनी माझ्य़ापुढे हात टेकले आहेत.  आणि अंकल  तरी कसे ? ते  नेहमी माझी  बाजू  घेतातच असं मी म्हणत नाही.  पण नीदान  मला  उपदेशाचे डोस कधीच पाजत नाहीत.  त्यांच्या मते प्रत्येक माणसाची बुद्धी स्वयंपूर्ण असते म्हणून  प्रत्येक  गोष्ट माणसाने  स्वतःच्या  बुद्धिनेच केली पाहिजे. खरं तर  यासाठीच  मी अंकलना इतकं  मानतो.  पण माणूस  कोणत्या  क्षणी कसा  बदलेल याचा काय  नेम सांगावा?
                  कमाल आहे -अंकल पण संध्याकाळी  हेच सांगत होते-माणूस कोणत्या क्षणी  कसा बदलेल याचा काय नेम?  आणखीन  काय काय सांगत होते अंकल? काहीच  आठवत नाही आणि आठवणार पण नाही आणि आठवणार तरी कसं ?  काही  स्वरलहरी कानाच्या पडद्यावर  निनादल्या  आणि त्यामुळे डोक्याच्या  कुठल्या तरी  कोप-यात  काहीतरी स्पंदन  झाले होतं.  येवढंच. एका कानाने  ऐकून  दुस-या कानाने  बाहेर  टाकण्यासाठी  तरी  जेवढे लक्ष दिले पाहिजे तेवढे पण मी  त्यांच्या  बोलण्याकडे....
           समजा आता मी गुलमोहराच्या  झाडाला नीट बघू  शकलो तर  " त्या दिवशी " झाडाखाली उभे असलेले अंकल मला दिसू  शकतील का ?   आणि तसे  ते दिसले  तर त्यांची गोष्ट मला समजू  शकेल का? नक्कीच! याचसाठी  तर माझ्या  रक्ताचा कणनकण वाट बघतोय -एक असह्य  ताण नसानसातून  असूनसुद्धा!  मला  खात्री आहे-अहं-मला-काहीच खात्री  नाहीये!
              सकाळी मम्मी म्हणाली-"बाबारे, संध्याकाळी  वेळ काढू   शकलास तर जरा  तुझ्या प्रिय अंकलच्या   दवाखान्यात जाऊन ये. त्यांचं तुझ्याशी  काम आहे  थोडंस."
            या मम्मीच्या बोलण्यातून  अस्मादिकांसाठी  सततच व्यंगबाण!   आता सुद्धा किती  शिताफीने  'वेळ काढू शकलास तर'   आणि "तुझ्या  प्रिय" शब्दांचा प्रयोग केला.!  वाटलं तिला सांगाव-मम्मी, काही फायदा नाही-माझ्यात काहीही सुधारणा होणे अशक्य! रोज जसे  तुमचे  चार उपदेश  ऐकावे  लागतात तसे  आजपासून  अंकलचे पण म्हटलं अंकल ,  आज तुम्हाला पण पाहूनच घेऊ.
            अंकल बरं काय गोष्ट सांगत होते ? ते  म्हणाले की , या गोष्टीवर फक्त माझाच हक्क  होता!  म्हणजे  नक्की काय ?  अगदी  अंकलचा पण या गोष्टीवर हक्क नव्हता? अंकल  म्हणे  कधीपासून  विचार  करीत होते. -मला हे सर्व  सांगावं का- आणि सांगावं तर कसं ? तयारी  होत नव्हती....
                  माझे कान आणि मन एकदम टवकारले  गेले.  हेच ते- हेच जाळं, आज  वर्षानुवर्ष चालत आलेलं-  गोष्टीच्या  नावाखाली उपदेश देण्याचा प्रयत्न कुणी  केला नाही ?  आजीच्या  गोष्टी  -नाहीतर  शाळेतल्या त्या  पंचतंत्रातल्या  गोष्टी पपा. गोष्ट सांगतो बरं  का !"  आणि मग गोष्टीच्या  शेवटी  -"बरं  का!"  आणि मग  गोष्टीच्या  शेवटी-"बघितलंस ना- असं होतं -म्हणून असं वागावं..."
         पपांना सुरवातीच नाटक कधीच  पुढे टिकून ठेवता आले नाही.पण का हे सगळं ? तर म्हणे  मी  आताशा बिघडलो  आहे तर - त्यात  त्यांच काय जातं?
                 म्हणे पूर्वी  मी फार  हुशार होतो- ओके, असेन!
                 म्हणे आताशा माझं मन अभ्यासात नसतं -
                 ठीक आहे-माझेच मन आहे ना? का ते पण त्यांचच आहे- त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला?
                  त्यांच्या म्हणे माझ्याबद्दल फार अपेक्षा होत्या.
                 कुणी सांगितलं  होतं?
         म्हणे मी  दिवसभर, रात्रभर  कुठेतरी  भटकत असतो-
         त्यात काय माझे मित्र पण भटकतातच की!
          म्हणे मी कपडे, दाढी, संगत कशाचाच विचार करत नाही, हिपप्यासारखा वागतो.  आता पपा, तुमच्या  समाधानासाठी  कॉलेजला तर जातोच-  दरवर्षी पासही होतोच! आणि भटकू नको तर काय करू ?  कुणीतरी प्लीज पापांना सांगा की   आता त्याचा  काळ राहिलेला नाही की  काही कारण नसले तरी चांगुलपणा  धरून ठेवा- नीट अभ्यास करा. यश  किर्ती  मिळवा. असं करा,  तसं करू नका!  आमच्या जीवनात काय उरली आहे या मुल्याची जागा?  चांगल्या डिग्य्रा किंवा चांगल दिसण-वागण यांचा आता नोकरीसाठी कुठे  उपयोग आहे का?  काहीही करायला घ्या- ते करण्यासाठी  इतके उमेदवार टपून बसले आहेत की , मला तर सगळं  बोअरच झालयं.कुणी  सांगितली ती शर्यत? ती धावाधाव? यात  मला काही  इंटरेस्ट वाटणंच शक्य नाही . पण हे पपा, तुम्हाला नाही कळणार आणि  अंकलना पण नाही...
            अंकल सांगत होते-'एक दिवस मी असाच तुझ्या खिडकीतून  दिसणा-या त्या गुलमोहराच्या  झाडाखाली  उभा होतो- उगीचच, निरर्थक, तू तेव्हा क्रिकेट खेळत बसला होतास."
           " तुम्ही माझ्या कोणत्या भावनांना  हात  घालू  पहातायं अंकल?  क्रिकेटच्या  आठवणीने भावविवश होईन आणि  तुम्ही मला बोधामृताचे चार घोट पाजाल, असं का वाटत तुम्हाला? कित्येक वर्षात  मी क्रिकेटची बॅट म्हणून हातात घेतली नाही- बोअर झालोय! कधी आवडत असेल तर क्रिकेट खेळायला-पण ती  बालपणीची बालीश आवड  एवढचं  पण तुम्हाला काय सांगायचय ते तुम्ही  पटकन सांगून टाकावं  म्हणून मी हे काही बोलत बसत नाहीतुमच्याजवळ  माझी  मित्रमंडळी वाट पहात असतील. मी कधी  तुमच्या  तावडीतून  सुटून  त्यांना  जॉईन  होतोय याची  मला पण  झटकन तुमच्या  समोरून उठून जाता आलं  असतं तर बरं  झालं  असतं- पम पावसाने  असा काही  सूर  लावलाय की , धड पडतही नाही आणि धड थांबतही  नाही-''
            खरंच- हा पाऊस- धड पडतही नाही  आणि  धड थांबतही  नाही.  आता रात्रीचे  दोन वाजले  असले तरीही!  पण समोरच्या  गुलमोहर मला अंधुकसा दिसू लागलाय.  अनं ते  दृश्य  पण खरंच - "त्या दिवशी'  म्हणजे  सुमारे  बारा वर्षापूर्वी -मी  जेव्हा सहा वर्षाचा असेन -तेव्हा  अंकलपण  अठरा एकोणीस वर्षाचे नसतील का? म्हणजे माझ्या  आजच्या  वयाचे आणि  हो!  मला आठवतयं एक दिवस  नक्कीच  माझ्यावरूनच  काहीतरी गप्पा चालल्या  होत्या अंकलची आई मम्मीला सांगत होती-
          "बाई , बाई शाळेतून कॉलेजमध्ये  गेल्यावर   मनीष पण  अगदी अस्साच  झाला होता- भलभल्या संगतीत पडला होता- पण देवीचीच कृपा- का कोणास ठाऊक  एकदम  त्याच्या  मनानी  घेतलं की , आपण  डॉक्टरच व्हायच-अगदी उत्तम डॉक्टर व्हायच आणि  सुधारला बघा -नाहीतर  ही आजची मुल म्हणजे-"
          म्हणजे मी का अंकल? आता पहाच  मम्मी, अंकल पण माझ्यासारखे बिघाडले होते नंतर सुधारले....
          अरे,  हे काय येऊन गेलं माझ्या  मनात?  "अंकल नंतर सुधारले" म्हणजे  काय मी बिघडलो  आहे  आणि पुढे  कधीतरी  सुधारणार  आहे आणि  वर हे  कबूल  करतोय? कशासाठी  सुधारायचं  आणि कुणासाठी  छे छे!  असा मी  हरणार  आहे  का आज!  पण अंकल शेवटी सुधारले ते काय म्हणून ?  काय मिळालं असेल त्यांना सुधारून ? आणि  आधी बिघडलेले अंकल कसे असतील ?  अर्थात अंकलच्या आई- वडिलांना कधी त्यांच्याबाबतीत असं  निराश व्हावं लागलं  असेल हे कबूल  करायला मन तयारच होत नाही .मी त्यांना  बघत  आलोय  तेव्हापासून -
                  बाहेर जोरात ढगांचा  गडगडाट आणि  विजेचा  क्षणिक  अग्नीलोळ. त्यात क्षणभरच दिसलेलं ते क्रिकेटच मैदान आणि कडेचा गुलमोहर!  शेवटी  हा साचलेला पाऊस  कोसळणार तर?  आणि  अंकलची ती गोष्ट?
          ...... ती म्हणजे, अंकलने संध्याकाळी सांगितलेली नव्हे- तर पहातयं -ती गोष्ट -जी मला दिसेल -फक्त  मलाच-
           ......  होय-मी क्रिकेट खेळत असे या समोरच्या  मैदानातच!  मी पाच  सहा  वर्षाचाच होतो. मैदानात सकाळ -संध्याकाळ कुठली ना कुठली टीम  प्रॅक्टीस करीत  असायची .एका  कोप-यात  माझी  स्टंप कायमचीची गाडलेली  असे.  प्रत्येक  ओव्हरच्या  मध्ये बोलरने एकदा माझ्या  मोठ्या  सप्तरंगी बॉलनने मला पण बोलिंग टाकायचे  हा आमचा  ठरून गेलेला नियम  होता. आणि मग  मी पण  बॅट  घेऊन  बॉलच्या  मागे  असा लागायचो की,  एका बॉलमध्येच माझी सेंच्युरी पूर्ण व्हायची.
               अंकलनीच सांगितल- त्या दिवशी ते  उगीचच या रस्त्याने जाता जाता गुलमोहराखाली  थांबले  होते आणि  या छोटया  क्रिकेटविरानं त्यांचं  लक्ष वेधून  घेतलं होतं. आणि कसं कुणास ठाऊक - अचानक  बॉल आला जरा  वेगातच आणि स्टंप  उखडून टाकीत  बाऊंड्रीच्या  बाहेर रस्याकडे उडाला -इकडे  एका हाताने  चड्डी सांभाळत   बॅटसमनन रस्त्यावर येऊन  बॉलला हूक केले  आणि तिकडे  समोरून  येणा-या ट्रकनं बॅटसमनला-
           मला नेहमी फक्त एवढच आठवत की , डोळे उघडले  तेव्हा मी  हॉस्पिटलमध्ये होतो आणि मनीष  अंकल माझ्यासमोर  पण  आज  इतरही  खूपसं आठवू पाहतय वेदनांनी मळा रडू कोसळत होत पण  परक्या माणसासमोर  कसंरडणार असं  वाटलं होत का मला ? हा, आता समोरचा  माणूस डॉक्टर  असेल तर  त्याच्यासमोर  रडायला हरकतनाही.मी अंकलना विचारलं -"तुम्ही डॉक्टरच आहात ना?  पटकन काही  उत्तर  न सुचून  ते म्हणाले- 'हो' -आणि माझं थोपवून  ठेवलेलं रडू  बाहेर फुटलं- हे कोडं त्या डॉक्टर साहेबांना सुटण शक्य नव्हत.
             तेव्हा मी कित्येक महिने  दवाखान्यात होतो. जीवनाचा सगळा दवाखान्याचा शेअर संपवायलाच जणू . रडत पण . खूप  असे ते पण  बहुतेक रडण्यात सगळा  शेअर  संपवण्यासाठीच , का  कोणास ठाऊक  पण मला सगळी औषध  मनीष अंकलनेच द्यावीत म्हणून मी अडून  बसे. इतर कोणी  माझं  ड्रेसींग केलेल मला चालत नसे. इंजेक्शन पण  त्य़ांनीच  द्याचे हा माझा हट्ट  असायचा  मला  समजावता समजावता  सगळ्यांच्या  नाकी नऊ यायचे. पम या  हट्टातूनच अंकल आणि  आमचा परिवार  एकमेकांचे  मित्र झाले.
             बाहेर सगळं कसं शांत शांत झालयं! पाऊस थांबल्यासारख वाटतोयच मी विचार करतोय -संध्याकाळी  खरोखरोच  अंकलने मला काही लेक्चर , काही उपदेश दिलाय का? पण मला काहीच सुचत नाहीय!  समोरचा गुलमोहर आता स्पष्ट दिसतोय मला.  एकदम आठवलं  अंकलची आई एकदा म्हणाली होती की, आधी अंकल इंजिनीयरींगला  होते -आणि वाईट संगतीत पण पडले होते. आणि अचानक  एक दिवस हट्टाने  त्यांनी मेडिकलला  ऑडमिशन घेतली.
              ......का  आणि कधी ? आमच्या  आणि त्यांच्या  घरात कुणाच्याच लक्षात न आलेली  उत्तरं! आज  अंकलनी पण कुठे सांगितलय?  त्यांना काय माहित आहे की,  त्यांच्या इंजिनीअरींग स्टुडण्ट असण्याची  आणि बिघडण्याची  गोष्ट मला माहित आहे  म्हणून? पण त्यांनी  मेडिकलला  हट्टाने  ऑडमिशन  घेण्याचे कारण  आणि वर्ष दोन्ही  मी सांगू  शकेन  आताच मला पण ते कळलयं ना!
  मला वाटतं मला बहुतेक झोप लागणार आहे........
-------------------------------------------------------------------------
                                                 लीना मेहेंदळे