शनिवार, 25 दिसंबर 2010

अनुवादाचे उपकारी कार्य --नित्य लीला

अनुवादाचे उपकारी कार्य
27 Sep, 2003, 2344 hrs IST
देशी भाषा जाणणाऱ्या सराईत अनुवादकांची आपल्याकडे एक फळी होती. रा. भि. जोशी , शं. बा. शास्त्री , सरोजिनी कमतूनकर , श्रीपाद जोशी , वा. रा. कान्त , हे त्या आखाड्यातले रथी कालांतराने अस्ताला गेले. शारदेची कृपा झाली आणि सरस अनुवादकांची पलटणच गेल्या 25 वर्षांत उदयाला आली. अशोक शहाणे , राम पंडित , आनंद वटीर् , अरविंद कोरबा , मीना वांगीकर , न. म. जोशी , धनश्ाी हळबे , विलास गिते , चंदकांत भोंजाळ , उमा कुलकणीर् , मृणालिनी गडकरी ही त्यातली काही गुणवंत नावं. या यादीत आता दोन नावं मिळवली पाहिजेत. एक आहेत सोलापूरचे कवी लक्ष्मीनारायण बोल्ली आणि दुसऱ्या आहेत भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकारी लीना मेहेंदळे. बोल्लींची मातृभाषा तेलुगू असून त्यांनी एकवीस कीतिर्वंत तेलुगु कथा घरगुती मराठीत भाषांतरित केल्या आहेत. शीर्षक : ' रात्र- एका होडीतली ' प्रकाशक : सुविद्या प्रकाशन , उत्तर कसबा , सोलापूर- 7, प्रस्तावना- विजय तेंडुलकराची. मामिर्क नि जेवढ्यास तेवढी. या 21 तेलुगु कथाकारांपैकी एकही नाव आपल्या परिचयाचं नाही. मात्र कथांमधून व्यक्त झालेलं वास्तव अगदी आपल्यासारखंच आहे.

अनुवादित कथांच्या दुसऱ्या संग्रहाचं शीर्षक आहे : नित्य-लीला. लीना मेहेंदळेंच्या या संग्रहाचे प्रकाशक आहेत : देशमुख आणि कंपनी , पुणे- 30. सिद्धार्थ पारसनीस यांचं मुखपृष्ठ घरंदाज आहे. रंगमेळ विलोभनीय. संग्रहात 11 अनुवादित गोष्टी- मुख्यत: हिंदीतल्या आहेत. दोन स्वतंत्र कथा लीना मेहेंदळेंच्या आहेत. फणीश्वरनाथ रेणू हे लढाऊ बाण्याचे हिंदी कथाकार. या संग्रहातली ' नित्य-लीला ' ही त्यांची कथा मात्र कृष्णचरित्रातली एक कोमल छटा चित्रित करते. ' बायकाच त्या ' ही सुधा अरोरा यांची कथा उपरोधिक आणि मामिर्क आहे. लेखिकेच्या स्वतंत्र कथा वाचनीय आहेत.

ठिबकसिंचन , जैविक खतं वगैरे शेतीशी निगडित उद्योग विधायक नजरेने चालवणारे जळगावचे भवरलाल जैन यांचं , देशाच्या नि समाजाच्या विधायक बांधणीचा साधकबाधक विचार मांडणारं पुस्तक ' ग्रंथाली ' ने ' ज्ञानयज्ञ ' योजनेत प्रकाशित केलं आहे. शीर्षक : आजची समाजररचना : तिचे स्वरूप व पुनर्बांधणी. समाजात सध्या मूल्यभावनेची घसरगुंडी सुरू आहे , भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा रुदावतार मोकाट सुटला आहे , त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यर्कत्यांना साधनशुचितेचं महत्त्व वाटेनासं झालं हे आहे. ही अवस्था निपटून त्या ठिकाणी गतिशील आणि प्रभावशील समाजनिर्माण करण्यासाठी कोणत्या आमूलाग्र सुधारणा झाल्या पाहिजेत , ते जैनांनी सांगितलं आहे. साठ वर्षांवरील कुणीही निवडणूक लढवू नये , म्हणजे 65 व्या वषीर् सगळे आपोआप निवृत्त होतील , असा एक मार्ग जैन सांगतात. कर्जउभारणी , चलननिमिर्ती , करमर्यादा , प्रशासकीय खर्चात कपात वगैरे उपाय त्यांनी सुचवले आहेत. तथापि राजसत्तेच्या सुकाणूवर बसलेले निर्लज्ज पुढारी विधायक विचारवंतांचं बारसं जेवलेले असतात , ते असल्या सूचनांकडे उपेक्षेनेच पाहणार , ही दगडावरची रेष!
- रवींद पिंगे