बुधवार, 6 नवंबर 2013

अच्युतराव आपटे -स्मरणिकेसाठी (२०००) Full DTP

अच्युतराव आपटे 1-6 )--13 are here.

अच्युतराव आपटे --स्मरणिकेसाठी (२०००)


26.2.2000
अच्युतराव

अच्युतराव आपटे गेल्याची बातमी आली ती मनाला चटका लावतच.पुण्याहून मिस्टरांनी फोन करुन सांगितलवाईट बातमी आहेतेंव्हा मनात पहिली शंका हीच आलीत्यांची प्रकृति अगदी हळू हळू खालावत होतीतरीही मन व चिंतनपर बुद्धि शेवटपर्यंत खंबीर होतेम्हणूनच ऐवढ्या लवकर ते जातील अस वाटल नव्हत.
अच्युतरावांचा आणि माझा परिचय गेल्या पंचवीस वर्षांचा होतावयाने व मानानेही ते खूप मोठे होतेतरी पण त्यांना काका वगैरे म्हटलेल आवडत नसावकधीही अचानक  येई- “मी अच्युतराव आपटे बोलतोय्.”त्यामुळे मनात तोच संदर्भ ठसला.

खरे तर अच्युतराव हे माझ्या वडिलांचे सहपाठीमला हे आधी माहीत नव्हतेते त्यांनीच सांगितलेपुढे माझे वडील पुण्याला आल्यावर त्यांच्या गाठीभेटी घडतपण मला नेहमीच त्यांनी एक स्वतंत्र व्यक्ति म्हणू वागवले.

माझा व त्यांचा परिचय मी पुण्याला सर्वप्रथम पोस्टिंगवर प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून आले तेंव्हाचाशैक्षणिक सुधारणा व्हाव्यात-मुलांना अगदी सुरुवातीपासून कौशल्य शिक्षणस्किल एज्युकेशन यावे.वगैरे पुष्कळ विचार तेंव्हापासून मनात येत होते.
ते सर्व सुमारे वीस-पंचवीस पानं लिहून काढले होतेपण पुढे कांय?त्यावेळी हवेली प्रांत अधिकारी श्री खानविलकर यांनी दोन व्यक्तींबरोबर गाठ घालून दिलीएक खानापूरचे गोपाळराव मोडक व दुसरे अच्युतरावदोघांचा शिक्षणक्षेत्रात मोठा अधिकार आणि काम करण्याची पद्धत निराळी.
अच्युतरावांबरोबर पहिल्या भेटीतच लक्षांत आल की ते कामाला वाहून घेणा-यांपैकी आहेतविद्यार्थी सहायक समितीचे काम एवढेच मर्यादित काम त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हतेजात असूनही ते खडकवासला येथील CWPRS च्या कार्यालयात उच्च पदावर नोकरी करीत होते.तिथून उरलेला सबंध वेळ त्याहून जास्त कामाचा असायचाविद्यार्थी सहायक समितीचे कामBeyond friendship आणि मैत्रीच्या पलीकडे या त्रैमासिकाचे कामशिक्षण क्षेत्रातील असंख्य परिचितांचे कामकुणीही आपले काम घेऊन त्यांच्याकडे गेले की त्यांना ते आपलेच काम वाटत असे आणि त्यांत तितकेच लक्ष घालून काम पूर्ण व्हावे याचा ते प्रयत्न करीत.
शिक्षणाबाबतचे माझे विचार वाचल्यावर त्यांनी मनावर घेऊन एक बैठक घडवून आणलीया बैठकीसाठी सर्व तयारी त्यांनीच केलीमाझ्या लेखाच्या सायक्लोस्टाइलने पंचवीस तीस प्रती काढून घेतल्यात्या काळात झेरॉक्स शुरू झाले नव्हते.
स्वतःच्या सहीने बैठकीची निमंत्रण पाठवलीत्या बैठकीत पुण्याचे कुलगुरू श्री दाभोळकरश्री ए.बी शहानिर्मलाताई पुरंदरे यांच्या सारखी शिक्षण क्षेत्रात मोठा अधिकार असलेली मंडळी होतीमाझ्या सारख्या नुकतच कॉलेजजीवन संपवून नोकरीत रूजू झालेल्या छोट्या व्यक्तीसाठी त्यांनी एवढी मोठी माणस का बोलावली व ती देखील का आली? दुस-या प्रश्माच उत्तर सोप आहेअच्युतरावांच्या शब्दाला तेंव्हा (व शेवटपर्यंत)खूप वजन होतेते कांही नवीन विचार करू इच्छितात म्हणजे नक्कीच तो विषय महत्वाचा असेल अशी सर्वांना त्यांच्याबद्दल खात्री होतीत्या खात्रीपायीच सर्व मंडळी चर्चेला आली होती.
पण पहिल्या प्रश्नाच कांय? ते मला त्यांनीच बोळून दाखवलसरकारी अधिकारी म्हणून नोकरीत लागलेली माणस फारसा विचार करीत नाहीत आणि सातत्याने एकाद्या विषयाचा पाठपुरावा करू शकत नाहीततुम्ही वयाने व अनुभवाने लहान असल्या तरी विचार करताय आणि तो कसा राबवता येईल याची काळजी बागळगताय हा महत्वाचा मुद्दा आहेही तुमची वृत्ति टिकून रहावी म्हणून माझा हा हातभार लावत आहे.सरकारी नोकरीत विचार करण सोडून द्यायच नाही यासाठी एकापरीने
मिळालेल ते माझच शिक्षण होत.
बैठकीच्या वेळी भरभक्कम नाश्ताचहा याची व्यवस्था तर अच्युतरावांनी केली होतीच पण बैठकीचे वृत्तांत तयार करवून घेऊन ते सर्वांना पाठवण्याची व्यवस्थादेखील केली होती.
पुढे याच विचाराची पुढली पायरी म्हणून खानपूरच्या डॉमोडक यांच्या सह्याद्री विकास मंडळ या संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रापैकी वरदाडे या गांवी दहा ते वीस वर्ष वयोगटाच्या शाळा सोडून घरी बसलेल्या मुलांसाठी व्यवसाय शिक्षणाची जोड असलेला एक शैक्षणिक कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवलेत्यासाठी मीखानोलकर व डॉमोडक यांच्या ब-याच बैठका झाल्यात्याबाबत मी मधून मधून अच्युतरावांना भेटून चर्चा करीत असेसह्याद्री विकास मंडळाच्या मार्फत शाळा सुरू करण्यांत कांही अडचणी होत्या म्हणू एक वेगळी सोसायटी काढून काम करावे असे ठरले.त्यासाठी आम्ही तिघेच कार्यकर्ते आणि आम्हीच पदाधिकारी देखील.एव्हाना मी प्रोबेशन संपवून हवेळी प्रांताचा कार्यभार घेतला होता आणि खानापूर माझ्याच कार्यक्षेत्रात होतेमात्र या उपक्रमासाठी पैशाची तरतूद करण्यासाठी माझ्या नांवाचा
आणि पदाचा वापर कुठेही करायचा नाही ही सर्वांवर एक मोठी मर्यादा होतीखानोलकर त्याच सुमारास सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बॅबकॉक हॅचरीमध्ये रुजू झाले होतेसह्याद्री विकास मंडळाकडे खेळते भांडवल कांहीच नव्हतेपैसे आणायचे कुठून? हा प्रश्न अच्युतरावांपुढे मांडल्यावर त्यांनी लगेच पाच हजार रूपये देऊन कामाला सुरुवात करा असे सांगितलेत्यामुळे बँक खात उघडल जाऊन एक रिटायर्ड शाळा मास्तरांना नेमून कामाला सुरुवात झालीमात्र मला फिरतीमुळे आणि इतरांना इतर कारणांमुळे या शैक्षणिक कामाकडे लक्ष देता आले नाही.मनाप्रमाणे व्यवसाय शिक्षणाची गाडी पुढे सरकेनानेमलेले शिक्षक वारंवार आधी तीन-चार वर्षांत मुलांना मॅट्रिक करुन घेण किती महत्वाच आहे आणि ते झाल्याशिवाय व्यवसाय शिक्षण सुरू करण किती चुकीच आहे ते सांगू लागलेया त्या कारणाने शेवटी हा उपक्रम बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
मग आमच्या पदरचे पैसे जमा करुन अच्युतरावांना पैसे परत करायला मी गेलेत्यांनी पैसे घेण्याचे नाकारलेतुम्ही प्रयत्न केलेत्यांत चुका झाल्या असतीलपण
प्रयत्न वाईट नव्हतेप्रयोगांत यश-अपयश येणारच असे सांगून त्यांनी पैसे न घेताच मला परत पाठवले.
या काळात मला त्यांच्याकडून व्यवस्थापनाचे धडे मिळाले अस म्हणायला हरकत नाहीत्यांच्या विषयावर फाईल्स रचून ठेवलेल्या असायच्या.त्यांचे नंबरविषय इत्यादि त्यांना नेमके माहीत असायचेरोजच्या रोज काम हातावेगळे करायची शिस्त होतीजनसंपर्क किंबहुना विद्वज्जन संपर्क खूप मोठा होताआणि ‘क’ चे काम ‘ख’ कडून होऊ शकते असे वाटलेकी लगेच ‘क’ च्या वतीने ‘ख’ बरोबर संपर्क साधून कामाचा अंदाज देऊन दोघांची पुढची गाठभेट ठरवून दिली जात असेहे करतांना क आणि ख दोघेही समोर नसले की फोनवर वेळ जायचा अच्युतरावांचा पण त्याचे त्यांना कांही वाटत नसेकाम झाले पाहिजेचांगले काम प्राथम्याने झाले पाहिजेहेच त्यांचे ध्येयवाक्य होते.
याच काळात येरवडा येथे SOS बालग्राम स्थापण्यासाठी तर फुलगावला विसस च्या वतीने एक बहु-उद्देशीय संस्था काढण्यासाठी जागा हवी होती ती मिळवून देण्यांत हवेली प्रांत अधिकारी म्हणून माझा थोडा हातभार लागलाविद्यार्थी सहायक समितीच्या विद्यार्थ्यांबरोबर अधून मधून चर्चेची संधी मिळावी असा मी त्यांना आग्रह केलाती संधी पण मिळवून देतत्या मुलांसाठी जी कमवा व शिका योजना चालते त्याबद्दल त्यांची माझी बरीच चर्चा होत असे.
विद्यार्थी सहायक समिती मधे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येऊन रहाणा-या विद्यार्थ्याला कमीत कमी खर्चात रहाणेजेवण व शिक्षणासाठी शांत वातावरण मिळाव हा संस्थेचा उद्देश यासाठी देणग्या गोळा करून मुलांचा व संस्थेचा खर्च भागवायचात्यासाठी विद्यार्थ्यांना फारशी तोशीच लागू द्यायची नाही ही मनोवृत्तिदशकांत सुरु झालेली ही संस्थामी सत्तराच्या दशकांत पहात होतेआणि तिथून पुढे ऐंशी,नव्वदाचा दशकातही पहात असतांना खु्द्द अच्युतरावांच्या कार्यप्रणालीत कसा फरक पडत गेला ते देखील पहायला मिळालेविद्यार्थिनींसाठी वेगळे होस्टेल बांधले तर तिथे सोलर सिस्टम बसवून घेतलीअशा प्रकारच्या प्रत्येक कामात विचारपूर्वक आणि योजना पूर्वक काम होत असल्याचे कुणाही त्रयस्था सहज दिसून येईशिक्षणाकडून त्यांचे विचार स्त्री-शिक्षणस्त्रियांची प्रगति अशा विषयांकडे वळू लागलेले पण दिसत होते.
सरकारी अधिकारी नेमके कांय काम करतातकुठल्या उद्देशाने करतात आणि ते करतांना उद्देश पूर्ण होतो कां हा त्यांच्या गप्पांमधला पहिला प्रश्न असेमाझे पोस्टिंग यशदा सारख्या प्रशिक्षण संस्थेत झाले तेंव्हा,नाशिकला डिव्हिजनल कमिशनर म्हणून झाले तेंव्हाहीव शेवटी राष्ट्रीय महिला आयोगात झाले तेंव्हाहीत्यामुळे आपण कोणतेही धोरण किंवा कार्यक्रम किंवा त्याची कार्यप्रणाली ठरवतांनायशापयाने निकष लावतांना आपण हे का करतोहा प्रश्न विचारण्याची सवय मलाही लागलीमुख्य म्हणजे यांतील कोणतीही गोष्ट अच्युतरावांनी वडिलकीच्या नात्याने समजावून दिली असे नसून त्यांच्या हे आपोआप शिकायला मिळालेमला त्यांनी नेहमीच बरोबरीच्या नात्याने वागवले.अर्थात् त्यांच्या कुणाही सहका-याचे काम शासकीय कार्यालयात अडकले असेल तर ते हक्काने सांगत आणि माझ्या मुलांच्या प्रगतीबद्दल सर्वांत आधी विचारून घेत.

B

त्यांची व माझी शेवटची भेट नोव्हेंबर मधे झाली असावीशरीर थकत चालले असूनही स्मरणशक्ति व त्याहीपेक्षा आकलन शक्ति उत्तम होती.चर्चा करणेयोजा करणेकामे
होण्यासाठी सार्थक सूचना देणे हे त्या भेटीतही चालूच होतेपांडूरंग शास्त्रींचे जीवनदर्शनहिंदी तांत्रिक शिक्षणरेडियो आणि टी.व्ही चा शिक्षण प्रसारासाठी उपयोग इत्यादि त्यांचे अलीकडील विचारांचे विषय होता.

जीवनाकडे बघण्याची त्यांची वृत्ति आनंदाचीहोतीआयुष्यांत पैसा मिळवावाआपल्या कौशल्याच चीज करावमिळालेल्या पैशातून
सुखोपभोगासाठी चार गोष्टी खरेदी कराव्यातचांगले गाणेचांगले कार्यक्रम ऐकावेत इत्यादी गोष्टींना त्यांची मान्यता होतीमात्र ते फक्त नोकरीतून कमावलेल्या पैशांपुरती मात्र संस्थेसाठी भरपूर पैसे गोळा करूनही त्याचा वापर फक्त संस्थेसाठीच केलात्या कामातून प्रसिद्धीची हाव धरली नाहीकिंवा त्यासाठी कुठेही मिरवून घेतली नाही.मग एवढा जीव ओतून आपला वेळ आणि शक्ति संस्थेच्या कामासाठी का दिली याचे उत्तर त्यांनी एकदा मला सांगितलेब्राह्मण कसा असावातर सतत समाजाच्या उन्नतिचा विचार करणारात्यासाठी स्वतःचे शरीर झिजवणारातीन दिवसाच्या भरण पोषणापलीकडे कांहीही संग्रह न करणारा प्रसिद्ध पराङमुक वृत्ति बाळगणाराइत्यादीब्राह्मण असण्याची ही व्याख्या कुठल्या ग्रंथात आहे ते मला माहीत नाहीपण ज्यांना कुणाला ब्रह्मर्षी ही पदवी हवी असेल त्यांच्यासाठी ही व्याक्या मार्गदर्शक ठरेल.
अच्युतरावांच्या स्वभावात आणखी एक गोष्ट आढळलीज्याच्यात जो गुण दिसेल त्याची दखल घेऊनलगेच प्रशंसेची पावती देणेही पावती बहुतेक वेळा मी ऐकली आहे ती त्या त्या व्यक्तीच्या अपरोक्षचत्यांचे वाचन भरपूर होतेत्यामुळे कुठे कांय चांगले चालले आहे त्याची नोंद व दखल घेतलेली असायचीत्यावर चर्चा करायला त्यांना आवडायचे व त्यांतील कांही गोष्टी संस्थेत करता येतील का याचा विचार ते सतत करीत.
त्यांची वृत्ति त्यागी होती असे मी म्हणणार नाही कारण नोकरीच्या पैशातून त्यांनी गृहस्थ धर्म व्यवस्थित सांभाळलाछान छौकी नसली तरी उच्च अथिरुची बाळगलीपण संस्थेचे काम मात्र संपूर्णपणे निरपेक्षबुद्धिने केलेतेही आपली कार्यक्षमता पूरेपूर पणाला लावूनअशा व्यक्तीच समाजाला टिकवून धरतात आणि पुढे नेतात यात संशय नाही.पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डीलिट् दिली पण ते अशा कितीतरी सत्कारांच्या वरच्या होते हे निःसंशय!

त्यांच्या स्मृतीला माझे शतशः प्रणाम!

















कोई टिप्पणी नहीं: